शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

प्रस्थापितांविरुद्धची नाराजी, जातीय समीकरणेच ठरविणार निकाल कागवाड मतदारसंघ : राजू कागे यांचा ‘पंचकार’ की, श्रीमंत पाटील यांचा विधानसभा प्रवेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:47 IST

अथणी : प्रस्थापितांविरुद्धची नाराजी महत्त्वाची ठरतेय की, जातीय समीकरणे यावरच यावेळचा कागवाड विधानसभा मतदारसंघातील निकाल ठरणार आहे.

चंद्रकांत कित्तुरे ।अथणी : प्रस्थापितांविरुद्धची नाराजी महत्त्वाची ठरतेय की, जातीय समीकरणे यावरच यावेळचा कागवाड विधानसभा मतदारसंघातील निकाल ठरणार आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार राजू कागे आणि काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्यात चुरशीची लढत होत आहे. कागे विजयी झाल्यास तो त्यांच्या विजयाचा ‘पंचकार’ ठरणार आहे. तर तीनवेळच्या पराभवाची मालिका खंडित करून श्रीमंत पाटील विजयी झाल्यास ते प्रथमच विधानसभेत प्रवेश करतील.

कागवाड मतदारसंघात कागे, श्रीमंत पाटील, जनता दलाचे कल्लाप्पाण्णा मग्याण्णावर यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारात जोर मात्र काँग्रेस, भाजप आणि जनता दल यांचाच दिसत आहे. येथून राजू कागे १९९९ पासून म्हणजेच गेली १९ वर्षे आमदार आहेत. १९९९ साली काँग्रेसच्या पोपट पाटील यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राजू कागे यांनी संयुक्त जनता दलाच्या उमेदवारीवर विजय मिळविला होता. २००४ निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली आणि काँग्रेसचे किरणकुमार पाटील यांना पराभूत करून ते पुन्हा आमदार झाले. २००८ मध्ये त्यांनी काँग्रेसचे दिग्विजय पवार-देसाई यांचा पराभव केला. तर गेल्या म्हणजेच २०१३ च्या निवडणुकीत श्रीमंत पाटील (निधर्मी जनता दल) यांचा पराभव करून कागे यांनी विजयाचा ‘चौकार’ मारला. यंदा ‘पंचकार’ मारतात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काँग्रेसचे श्रीमंत पाटील यांनीही २००८ आणि २०१३ मध्ये निधर्मी जनता दलाच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढविली आहे. या दोन्ही वेळेला अनुक्रमे त्यांनी १४.७५ आणि ३०.१८ टक्के मते मिळवून ते तिसऱ्या आणि दुसºया क्रमांकावर आले होते. त्याशिवाय २०१४ ची लोकसभा निवडणूकही त्यांनी निधर्मी जनता दलाच्या उमेदवारीवर लढविली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यावेळी विजयी झाल्यास पराभवाची ही मालिका खंडित करून ते विधानसभेत प्रवेश करतील.

कागे हे गेल्या १९ वर्षांत केलेल्या कामांच्या जोरावर मतदारांना सामोरे जात आहेत. तर श्रीमंत पाटील यांनी कोणतीही सत्ता नसताना ‘अथणी शुगर फार्मर्स’ या साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासकामे केली आहेत. त्यांनी केंपवाड परिसरात ३४ पाणी योजना राबवून सुमारे १० हजार एकर शेती सिंचनाखाली आणली आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकºयांच्या विकासात योगदान दिले आहे. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता म्हणून केंपवाड परिसरातील कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात.

कागे यांना गेल्या तीन निवडणुकीत ४४ हजार ५२९ ते ४१ हजार ७८४ या दरम्यान मते मिळाली आहेत. याचाच अर्थ त्यांची व्होट बँक स्थिर असल्याचे दिसते. यावेळीही याच व्होट बँकेच्या जोरावर ते विजयाचा विश्वास व्यक्त करतात.श्रीमंत पाटील हे मराठा समाजाचे आहेत. प्रस्थापित आमदारांबाबतची नाराजी आणि आपले काम यामुळे आपणच विजयी होणार असल्याचा दावा ते करीत आहेत. यात नेमके कोण बाजी मारणार हे १५ मे रोजीसमजेल.लिंगायत समाजाचे मतदार सर्वाधिकया मतदारसंघात जातीय समीकरणही महत्त्वाचे ठरते. राजू कागे हे लिंगायत समाजाचे आहेत. तर श्रीमंत पाटील हे मराठा आहेत. या मतदारसंघात लिंगायत समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत. त्या खालोखाल मराठा, जैन आणि इतर समाजाची मते आहेत.

शेवटचे दोन दिवस महत्त्वाचेप्रचार शिगेला पोहोचला असताना हवा काँग्रेसची दिसत असली तरी शेवटच्या दोन-तीन दिवसांत मतदारांपर्यंत कोण अधिक पोहोचतो आणि त्याचे मन वळविण्यात कोण यशस्वी होतो, यावरच येथील निकाल अवलंबून असेलमतदारसंघातील एकूण गावे : ५२एकूण मते : १ लाख ७८ हजार ७३५पुरुष मतदार : ९२ हजार २२३महिला मतदार: ८५ हजार ८१२इतर : १३

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटक